पत्रकार दिन लोकशाहीचा आधारस्तंभ मळकटलेला…..
पत्रकारितेच्या नावाने खंडणी मागणारा तो कोण……
सावली:-६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस विशेष आहे. त्यांच्या लेखणीने समाजाला जागृत करण्याचे, अन्यायाला वाचा फोडण्याचे आणि विचारक्रांतीला चालना देण्याचे काम केले. त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून, आपण पत्रकारितेच्या मुळ उद्देशाला पुनःस्मरण करतो.
पत्रकारिता केवळ माहिती पोहोचवण्याचे साधन नाही, ती समाजजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून तिच्या लेखणीतून समाजाच्या आशा, आकांक्षा, वेदना आणि संघर्षांना आवाज मिळतो. समाजात सत्य पसरवणे, अन्याय दूर करणे आणि परिवर्तन घडवणे यासाठी पत्रकारिता महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ती वाचकांना विचारप्रवृत्त करते आणि प्रश्न विचारण्याची प्रेरणा देत
पत्रकारितेची ताकद ही सत्य शोधण्यात आणि अन्यायाला आव्हान देण्यात आहे. पत्रकारांची लेखणी समाजातील विसंगती, अन्याय, भ्रष्टाचार यांचा पर्दाफाश करते आणि सकारात्मक बदलांसाठी प्रोत्साहन देते. पत्रकारिता ही सत्याची पाठराखण करणारी शक्ती असून समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करते. लेखणीच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात आणि त्यावर चर्चा घडवून आणली जाते.
तथापि, आजच्या काळात पत्रकारितेला अनेक आव्हाने आहेत. खोट्या बातम्या, राजकीय हस्तक्षेप, आर्थिक दबाव आणि सत्याच्या बदल्यात फायद्यांच्या मागे धावणारी पत्रकारिता ही चिंतेची बाब बनली आहे. अशा वेळी प्रामाणिक, निःपक्षपाती आणि निर्भीड पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. सत्याचा शोध आणि समाजहित ही पत्रकारितेची मुख्य उद्दिष्टे राहिली पाहिजेत.
आज वास्तविक चित्र पाहिल्यास ज्यांच्या नावाने पोर्टल नाही असे लोक सुद्धा जिल्हा प्रतिनिधी बनवून लोकांना चुत्या बनवून चंद्रपूर गडचिरोली मीडियाच्या नावाने खंडनी मागण्याचे काम करीत आहे परिणामी ही बाब संपादकाला सुद्धा माहित नाही हे आजच्या खोट्या पत्रकारितेचे धोरण आखून अनेकांना आपल्या गोष्टीने गंडवीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे तेव्हा अधिकारी वर्गाने, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी, कंत्राटदार, यांचे सह अन्य लोकांनी जिल्हा प्रतिनिधींना नेमके तुमचे पोर्टलचे नाव काय एक बातमी लावून प्रकाशित करण्याचे आवाहन हेच आजच्या पत्रकार दिनाचे सार्थक होईल..