*युवकांनी वाईट व्यसन सोडून शैक्षणिक प्रगती करत,खिलाडीवृत्ती जोपासावी- निखिल सुरमवार*

0
105

*युवकांनी वाईट व्यसन सोडून शैक्षणिक प्रगती करत,खिलाडीवृत्ती जोपासावी- निखिल सुरमवार*

*व्याहाड खुर्द येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन*

 

निरनिराळ्या खेळांतील कौशल्य, प्रावीण्य व श्रेष्ठता अजमावण्यासाठी खेळांच्या स्पर्धा, सामने व शर्यती विविध पातळ्यांवर आयोजित केल्या जातात. या स्पर्धांना खेळीमेळीचे स्वरूप असते आणि यशस्वी खेळाडूंना पारितोषिके व पदके देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. प्राचीन काळी ऑलिंपिक क्रीडासामन्यांत अनेक प्रकारचे सामने होत. गेल्या शतकाच्या मध्यापासून राष्ट्रीय पातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांचे सामने भरविले जात आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑलिंपिक, आशियाई व ब्रिटिश राष्ट्रकुलीय क्रीडासामने प्रसिद्ध आहेत. जागतिक पातळीवर भरणाऱ्या फुटबॉल, हॉकी, बिलियर्डस, बॅडमिंटन, टेनिस इ. विशिष्ट खेळांच्या सामन्यांत, अनेक देशांतील नामवंत खेळाडू भाग घेतात.

 

‘जीवन हे एक क्रीडांगण आहे ’. त्यात परिस्थितीनुसार मानवाने आपला भाग खिलाडूवृत्तीने खेळावा आणि तो खेळत असताना अडीअडचणी, आपत्ती, सुखदुःखे व जयापजय यांना हसतमुखाने तोंड देणे योग्य असते. खेळामुळे अशी वृत्ती निर्माण होते. खेळाडूंच्या अंगी खिलाडूवृत्ती, सहकार्य, संघभावना, समंजसपणा, पराजय पतकरण्याचा दिलदारपणा इ. गुणांची जोपासना होते. तसेच खेळामुळे आत्मसंयमन, प्रसंगावधान, नेतृत्व, धाडसी वृत्ती यांचा विकास घडून येतो व आपली कौशल्ये दाखविण्यास वाव मिळतो. मनोरंजनाबरोबरच शरीरास व्यायाम मिळून मन आणि शरीर प्रसन्न वकार्यक्षम बनतात. म्हणूनच खेळांना व्यक्तिगत व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

आधुनिक शिक्षणशास्त्रांतही खेळांचे महत्त्व मान्य झालेले आहे वशैक्षणिक पद्धतीचे एक महत्त्वाचे अंग म्हणून खेळांकडे पाहिले जाते. खेळांना उत्तेजन देण्यासाठी खास सरकारी, तसेच शालेय आणि विद्यापीठीय संस्था अनेक योजना आखत असतात. उत्कृष्ट खेळाडूंना सरकारी शिष्यवृत्त्याही देण्यात येतात. त्यांच्या प्रशिक्षणाचीही देशात वा परदेशांतही सोय केली जाते. विविध औद्योगिक व व्यावसायिक संस्थाही क्रीडासामने भरवितात. उत्कृष्ट खेळाडूंना अशा मोठ्या संस्थांतून उत्तम प्रकारच्या नोकऱ्याही मिळू शकतात. अशा प्रकारे आधुनिक काळात खेळांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचे महत्त्व ओळखून निखिल सुरंमवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली यांचे मार्गदर्शनात

सावली तालुक्यातील मौजा.व्याहाड खुर्द येथे विपीएल कबड्डी प्रो.व्याहाड खुर्द यांच्या तर्फे ५५ किलो वजन गटातील खेळाडूंसाठी भव्य रात्रकालीन मुलांचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यात प्रथम बक्षीस ४१००० रुपये महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते नामदार विजय भाऊ वड्डेटिवार दुसरे बक्षीस ,३१००० हजार नरसिंग वेनगनवार तर तीसरे संयुक्तिक बक्षीस २१००० रुपये आशिष भाऊ पुण्यपकार, सुनिता ताई उरकुडे, तसेच संजू भाऊ मजोके यांच्या तर्फे असून प्रसंगी स्पर्धेचे उदघाटन मा.प्रशांत पाटील चिटणुरवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली,सहउद्घाटक मा.नरसिंग गणवेणवार व्याहाड खुर्द,अध्यक्ष म्हणून सौ.सुनिताताई उरकुडे सरपंच व्याहाड खुर्द,प्रमुख उपस्थिती मा.निखिल सुरमवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली यांचा हस्ते पार पडले.*

 

*स्पर्धेच्या उदघाटना उपस्थित युवकांना प्रोत्साहीत करताना कृषी उत्पन्न सावली बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार यांनी युवकांनी वाईट व्यसन सोडून शैक्षणिक प्रगती करत,खिलाडीवृत्ती जोपासावी असे प्रतिपादन केले.*

 

*यावेळी मा.केशव भरडकर माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य,मा.संजय मजोके,मा.टोंगे गुरूजी,मा.राजू टोंगे ग्रामपंचायत सदस्य, मा.हरीश चिवंडे ग्रामपंचायत सदस्य , मा. तंटामुक्त समिती अध्यक्ष सुभाष कर्णेवार गुरूजी,मा.पुंडलिक मडावी ग्रामपंचायत सदस्य ,मा.तेजस पुनवटकर, मा.अनिकेत शेडमाके व गावातील समस्त गावकरी उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here